बीड : शहरातील गल्लीबोळांत दिवसेंदिवस कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट वाढत चालला आहे. काही ठिकाणी शिक्षणाची गुणवत्ता असली तरी बहुसंख्य क्लासेसमध्ये ना शिस्त आहे. ना पारदर्शकता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे – मुला-मुलींच्या सुरक्षेची कोणतीही खात्री नाही.आज एखादी छेडछाड झाली आहे. पण जर उद्या एखादी बलात्कारासारखी अत्यंत भीषण घटना घडली –तर त्याची जबाबदारी कोण घेणार? का हे प्रकरण जे काही लोक दाबण्याचा प्रयत्न करत आहेत ते याची जबाबदारी घेतील का? पण अशा प्रकारांवर जर आजच आवाज उठवला नाही – तर उद्या भविष्यात अशा घटना घडू शकतात. प्रशासन आणि शिक्षण विभाग या गोष्टींकडे डोळेझाक करत आहेत – आणि हाच आपल्या शिक्षण व्यवस्थेचा सगळ्यात मोठा अपमान आहे. कोचिंग क्लासेसचा अनियंत्रित विस्ताराला कोण जबाबदार? या कोचिंग क्लासेसमध्ये हजारोंच्या फी घेतल्या जातात, भल्यामोठ्या जाहिराती, बॅनर्स लावले जातात.पण वर्गखोल्यांमध्ये मुलींची सुरक्षा आहे का? शिक्षक पात्र आहेत का? कोचिंग सेंटर चालवायला परवानगी आहे का? यावर कोणीच बोलत नाही. किंवा तपासणीही करणे गरजेचे समजत नाही. अनेक सरकारी व खाजगी शिक्षक स्वतःचे कोचिंग क्लासेस चालवत आहेत.शासकीय नोकरी करताना खासगी शिक्षण व्यवसाय करणे नैतिक व कायदेशीरदृष्ट्या कितपत योग्य आहे, हा प्रश्न आज गंभीर आहे. शिक्षण विभाग,प्रशासन झोपेत ?पण ‘बीड न्यूज आप तक’ जागं आहे! जे काम शिक्षण विभाग व प्रशासनाचं आहे – ते म्हणजे कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवणं, त्यांची परवानगी, तपासणी आणि मुली,मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी – हे काम आज कोणीच करताना दिसत नाही. म्हणूनच, बीडचा लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल ‘बीड न्यूज आप तक’ आता पुढाकार घेत आहे. शहरातील प्रत्येक कोचिंग क्लासला भेट दिली जाणार आहे. तिथली सुविधा, सुरक्षा, शिकवण्याची पद्धत, फी, माणुसकीची वागणूक आणि हे सर्व वास्तव जनतेसमोर आणलं जाईल – ‘बीड न्यूज आप तक’ च्या माध्यमातून आम्ही प्रशासना समोरही याचे व्हिज्युअल पुरावे, मुलाखती, प्रतिक्रिया दाखवणार आहोत. जर शिक्षकच क्लास चालवत असतील आणि विद्यार्थी वर्गाऐवजी थेट कोचिंग क्लासमध्ये जात असतील – तर मग शाळा आणि महाविद्यालयांची गरजच काय? आज कोचिंग क्लासेस कोट्यवधींचं उत्पन्न मिळवत आहेत, मोठ्या जाहिराती देतात, पण ना कर भरतात, ना कोणत्याही यंत्रणे कडे याचे उत्तर आहेत का?. हे उत्पन्न कसे आणि कुठून येते, याची पारदर्शकता आहे का? ‘बीड न्यूज आप तक’ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या मुद्द्यांवर निष्पक्ष आणि जबाबदारीने काम करत आहोत. आमचा उद्देश कोणावर आरोप करणे नाही, पण विद्यार्थ्यांचं आणि समाजाचं भवितव्य वाचवणे हाच आहे. ही भूमिका आम्ही पुढेही ठामपणे बजावत राहू. तीही कुणाच्याही दबावाखाली न येता. अशी मागणी आजाद पत्रकार शेख इमरोज शरीफ यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.
बीड शहरातील कोचिंग क्लासेसच्या लाखो कोट्यावधीच्या साम्राज्याची चौकशी करा : इमरोज शरीफ

