18.6 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या मुख्याधिकारी यांचेवर कार्यवाही करून पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करा : नगरसेवक ॲड विकास जोगदंड

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या मुख्याधिकारी यांचेवर कार्यवाही करून पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करा : नगरसेवक ॲड विकास जोगदंड

 

बीड : एकेकाळी बीड नगर परिषद नागरी सुविधा पुरविण्या साठी तत्पर आणि इतर नगर परिषदेने आदर्श घ्यावा अशी आदर्शवत होती. परंतु मागील चार वर्षाच्या प्रशासकाच्या कार्यकाळात त्यातली त्यात मुख्याधिकारी निता अंधारे यांच्या कार्यकाळात भ्रष्ट, ढीसाळ, आणि अनागोंदी कारभाराने उच्चांक गाठला आहे. केवळ टक्केवारीत धन्यता मानणाऱ्या मानवी संवेदना नसलेल्या नगर परिषद प्रशासनाला शहरातील नागरिकांचे काहीच देणे घेणे नाही नगर परिषद प्रशासन कुठल्या जन्माचा सूड उगावत आहे. भर उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. शहरातील माता, भगिनीं, बांधवांची पाण्यासाठी मोठी परवड होत आहे. बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बिंदुसरा धरण आणि माजलगाव धरणात मुबलक पाणी साठा असतांना ही जाणीवपूर्वक पाईप जोडणी चे कारण पुढे करत बावीस दिवसापासून शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचीत ठेवण्यात आले आहे. यांस सर्वस्वी मुख्याधिकारी निता अंधारे तसेच नगर परिषद प्रशासन जबाबदार असून त्यांचेवर कठोर कार्यवाही करून बीड शहराला तात्काळ सात दिवसआड सुरळीत पाणी पुरवठा करून जाणीवपूर्वक निर्माण केलेली पाणी टंचाई दुरु करण्यात यावी. अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा माजी नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे.

ads

Related Articles

ताज्या बातम्या